मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

दुर्गा नवरात्र पहिला दिवस

दुर्गा नवरात्र पहिला दिवस  शैलपुत्री माता  नवरात्र मधील मातेच्या नऊ रूपांपैकी शैलपुत्री मातेला भाविक भक्त प्रथम रूपात पूजा अर्चा करतात. नवरात्र मधील पहिला  दिवस शैलपुत्री मातेचा असतो.  नऊ  दिवस विविध नऊ देवी रूपांचे दुर्गा पूजन भाविक करतात. माता शैलपुत्री प्रथम रूपात पूजन केल्या जाते त्या आधी नवरात्र घटस्थापना केल्या जाते . शैलपुत्री  मातेचे रूप असे आहे कि, माता नंदी वर विराजमान आहे.  म्हणजे वाहन नंदी आहे . डाव्या हातात कमळ व उजव्या हातात त्रिशूल घेतले आहे. मातेच्या कपाळावर अर्ध चंद्र अलंकृत आहे. " शैलपुत्री " या शब्दाचा अर्थ पर्वताची मुलगी असा होतो संस्कृत मध्ये पर्वताला शैल असेही म्हणतात. यासंबंधी असलेल्या पौराणीक कथा मध्ये सांगितले आहे कि , आधीच्या जन्मात शैलपुत्री माता दक्ष राजा ची कन्या होती. तिचे आधीच्या जन्मिचे नाव "  सती " असे होते . सतीने घोर तपश्चर्या करून शिव शंकराला प्रसन्न केले होते . व त्यांनाच पती म्हणून स्वीकार केले होते . शंकराची अर्धांगिनी म्हणजेच माता सती होय. एकदा महाराज प्रजापती दक्ष ...

आराम व विचार

आराम व विचार                    झोप येत असल्यास झोप घेतलीच पाहिजे , कारण झोपल्याने थकलेल्या मेंदूला आराम मिळतो.  किंवा आपण म्हणू कि , शरीर व मेंदू थकला तर व्यक्तीला झोपेची आवश्यकता  असते .  त्यामुळे शक्य तेवढा आराम घडावा म्हणून झोपणे गरजेचे असते .  मात्र झोपेतून आळस उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यावी .  एखादया दिवशी केलेला आराम चालेल , परंतु ती नित्याची गोष्ट सवय करून घेऊ नये.  दिवसा झोपू नये व रात्री जागु नये .  दिवसा शरीर व मेंदू यांच्याकडून शक्य तेवढे कष्ट करून घ्यावे व रात्री आराम करावा.  ज्या कारणांसाठी दिवसा झोप घेतली ते कारण लक्षात ठेवा .  जर जास्त मोबाईल वापरून दिवसा झोपले तर परत झोपेतून उठल्यावर मोबाईल ला हात लावू नका .  मुड फ्रेश झाला असेल व उत्साह वाटत असेल तर मोबाईल शिवाय आपल्याला आवडणाऱ्या दुसऱ्या कार्यात स्वतःला गुंतून ठेवा.                                 ...

सुख आणि दुःख

सुख आणि दुःख                          खूप दिवस झाले Social Media  वर online राहतो पण मन शांत होत नाही . जास्तीत जास्त व्यथीत होते . लाख लोकांना होणारा आनंद यातून दिसते म्हणून नाही तर करोडो लोकांचे दुःख हि पाहता येते म्हणून. यावर हजारो मित्रांना एकाच वेळी मित्र बनवता येते . आयुष्यात कधीच न भेटता पण आपल्याला खूप मित्र मैत्रीणी या तयार करता येतात . त्यांचे सुख दुःख माहित करुंन घेता येतात , पण उपयोग काय ?????                       आपल्या घरात आपण एकटेच असतो . घराच्या दरवाज्यात तर कोणताच मित्र उभा नसतो . अश्या वेळी वाटते नक्कीच कुठे तरी काहीतरी चुकत आहे . आज आपल्याला Friend शोधावे लागतात आपल्या इनबॉक्स मध्ये आणि त्यांच्या समस्या माहित होतात आलेल्या Notification मध्ये . हा सगळं मायाजाल आहे . एखाद्याला थोडं जरी दुःख झालं , कोणाला घरी करमत नसेल असं एखाद्या न फक्त लिहायचा अवकाश कि , सहानुभूतीची जणू स्पर्धा सुरु होते . घरातील आई वडील भाऊ बहीण यांची घेत नसेल इतकी ...

सोचो जरा

यूरोप की विवशता - हमारी मूर्खता   *1.* आठ महीने ठण्ड के कारण, कोट पैंट पहनना उनकी विवशता *और शादी वाले दिन भरी गर्मी में कोट - पैंट डाल कर बरात ले जाना, हमारी मूर्खता..*   *2.* ताजा भोजन उपलब्ध ना होने के कारण, सड़े आटे से पिज्जा, बर्गर, नूडल्स खाना यूरोप की विवशता *और 56 भोग छोड़ कर ₹ 400/- की सड़ी रोटी (पिज्जा ) खाना, हमारी मूर्खता..*  *3.* ताज़ा भोजन की कमी के कारण फ्रीज़ इस्तेमाल करना, यूरोप की विवशता *और रोज ताजी सब्जी बाजार में मिलनें पर भी, हफ्ते भर की सब्जी फ्रीज में ठूँस सड़ा कर खाना, हमारी मूर्खता..*  *4.* जड़ी - बूटियों का ज्ञान ना होने के कारण, जीव जन्तुओं के माँस से दवायें बनाना, उनकी विवशता और आयुर्वेद जैसा महान चिकित्सा होने के बावजूद, माँस की दवाईयाँ उपयोग करना, हमारी मूर्खता..    *5.* पर्याप्त अनाज ना होने के कारण जानवरों को खाना, उनकी विवशता और 1600 किस्मों की फसलें होनें के बावजूद, स्वाद के लिए निरीह प्राणी मार कर खाना, हमारी मूर्खता..  *6.* लस्सी,मट्ठा, छाछ, दूध, जूस ,  शिकंजी आदि ना होने के कारण, कोल्ड ड्रिंक पीना...

शिकवण भगवान बुद्धाची

*🍀तथागत बुद्धांची शिकवण🍀* 🌀१) मूर्खांची संगती करु नका. 🌀२) विद्वानांची संगती करा. 🌀३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा. 🌀४) अनुकूल देशात निवास करा. 🌀५) चांगली कामे करा. 🌀६) चित्तास स्थिर ठेवा. 🌀७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या. 🌀८) विद्वान व्हा. 🌀९) संयमी राहा. 🌀१०) बोलणे मधुर व सत्य असू द्या. 🌀११) मातापित्याची सेवा करा. 🌀१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा. 🌀१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या. 🌀१४) दानधर्म करा. 🌀१५) धम्माचरण करा. 🌀१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा. 🌀१७) निर्दोष कर्मे करा. 🌀१८) पापकर्मापासून अलिप्त राहा. 🌀१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा. 🌀२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा. 🌀२१) गौरवाची भावना जोपासा. 🌀२२) मनाच्या शांतीची जोपासना करा. 🌀२३) क्षमाशील असा. 🌀२४) संतुष्ट असा. 🌀२५) कृतज्ञ असा. लीन असा. 🌀२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा. 🌀२७) मधुर भाषी, मितभाषी असा. 🌀२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या. 🌀२९) ब्रम्हचारी राहा. 🌀३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा. 🌀३१) निर्वाणाचा साक्षात्कार ...

झोपेतून उठल्यावर

झोपेतून उठल्यावर                                        वास्तुशास्त्रानुसार दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून उठल्यावर घरामध्ये देवाचे नाव स्तुती रूपाने घेण्याला विशेष महत्व आहे. सकाळी सकाळी ईश्वराचे चिंतन करावे . त्यासाठी खाली काही नित्य उपयोगी मंत्र व स्तोत्र देत आहे . याच्या नियमित वाचनाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते . व घराला अध्यात्मिक ऊर्जा मिळते .  वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।  निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। १ ।।  शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।  विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।  वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। २ ।।  कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।  प्रणत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।। ३ ।।  या कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।  या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।  या ब्रह्माच्युत्शंकरप्रभृ...

Vardhman Mahaveer

वर्धमान महावीर जयंती       मुळातच ख्रिस्त पूर्व ५२७ म्हणजेच जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वी कुंडलपूर येथे वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. भगवान महावीर ज्या काळात जन्मले त्या काळात हिंसा, पशुबळी, जातिभेद यांचे मोठे प्रस्त होते. या सर्व प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी आयुष्यभर शांततेच्या मार्गाने संघर्ष केला. त्यांचे संपूर्ण जीवन त्याग, समर्पण आणि तपस्या यांनी ओतप्रोत भरलेले आहे. तसेच त्यांनी संपूर्ण विश्वाला अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रम्हचर्य आणि धर्म यांची शिकवण दिली. २४ वे तिर्थंकर भगवान महावीर यांचे जीवन आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात प्रेम, दया आणि अहिंसा आचरणात आणण्याची शिकवण देते. आंतर-बाह्य जगात शांततेचा उद्घोष करण्यासाठी अहिंसा या व्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही.  अशा या जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांना जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!!